उष्माघात – उन्हामुळे खरंच मृत्यू होतो का ?

उष्माघात ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती असून ही एक जीवघेणी आहे. ज्यासाठी त्वरित वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे. उष्माघात हा सामान्यतः तेव्हा होतो जेव्हा शरीर घामाने पुरेसे थंड होऊ शकत नाही. हे गरम परिस्थितीत दीर्घकाळापर्यंत शारीरिक हालचालींमुळे किंवा जास्त कामामुळे गरम वातावरणात असण्यामुळे होऊ शकतो. आपण सगळेच उन्हात फिरतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना दिवसभर उन्हात काम करावे लागते, पण काही लोकांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? तर आपण पाहूया उष्माघात म्हणजे काय आणि त्यापासून घ्यायची काळजी.

उष्माघाताचे लक्षणे

उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान ३८ पेक्षा अधिक किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान ३७.७० से असते. उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण.

  • आपल्या सर्वांच्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, आणि या तापमानातच आपल्या शरीरातले सर्व अवयव व्यवसिथ काम करतात.
  • आपल्या शरीरातून घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, आपल्या शरीरातून सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे, जर आपण सतत पाणी पीत नाही राहिलो तर त्रास जाणवू शकतो.
  • पाणी शरीरात इतरही खूप अधिक महत्त्वाची कामं करतं असतो , त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.
  • जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने बंद होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
  • शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
  • आपल्या शरीरातले स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात.
  • रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो. माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
  • उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी सतत पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे
  • उष्माघातामुळे धडधडणारी डोकेदुखी, डोके दुखणे आणि मळमळ किंवा उलट्या होण्याची भावना होऊ शकते.
  • उच्च तापमानात जास्त शारीरिक कष्टामुळे शरीराला किंवा हातापायाला अशक्तपणा येऊ शकतो.

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा

Heat Stroke
उन्हाचा पारा चढत आहे.. त्यामुळे उष्माघात टाळण्या साठी खालील उपाययोजना करा

  • शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत करा.
  • काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या.
  • शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.
  • डोक्यावर पांढरा रुमाल, टोपी किंवा पंचा इत्यादीचा वापर करा.
  • जेवणात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.
  • कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा जास्तीत जास्त वापर करा.
  • दुपारी ११ ते ४ पर्यंत उन्हातील काम, प्रवास टाळा.
  • लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.
  • अशक्तपणा, थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.

उष्माघात झाल्यावर काय करावे

  • आपत्कालीन सेवांवर कॉल करा.
  • एखाद्याला उष्माघाताचा त्रास होत असल्याची तुम्हाला शंका असल्यास, तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे
  • व्यक्तीला थंड वातावरणात हलवा. त्यांना उष्णतेतून बाहेर काढा किंवा वातानुकूलित भागात घेऊन जा.
  • उष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी आहे आणि शक्य तितक्या लवकर व्यावसायिक वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे.
  • वैद्यकीय मदतीची वाट पाहत असताना, व्यक्तीच्या त्वचेला थंड पाणी लावून, पंखा लावून किंवा मानेवर, काखेत आणि मांडीच्या भागात बर्फ वापरून शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • जर ती व्यक्ती सावध असेल आणि गिळण्यास सक्षम असेल, तर त्यांना पुन्हा हायड्रेट करण्यात मदत करण्यासाठी थंड पाणी किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स द्या.

एकूणच, उष्माघात ही एक गंभीर स्थिती आहे ज्यावर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. लक्षणे ओळखून तत्काळ कारवाई केल्याने संभाव्य जीव वाचू शकतात आणि शरीराच्या उच्च तापमानाशी संबंधित पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकतात.

Leave a Comment